महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे.सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आणि त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहे.असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला होता. तसेच अशोक चव्हाण यांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना द्यावी अशीही विनायक मेटे यांनी केली होती.
विनायक मेटे यांच्या या आरोपावर आता काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विनायक मेटे यांनी केले आरोप हे धादांत खोटे असून त्याचे हे आरोप म्हणजे मराठा आरक्षणविरोधात केलेले कट कारस्थान आहे तसेच खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास स्वत:च केव्हाचा गमावला ., असा उलट आरोप सचिन सावंत यांनी विनायक मेटेंवर केला आहे.
‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण सर्वांना विश्वासात घेऊन पावलं उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असून त्यामुळे छुपी कारस्थानं करणाऱ्या मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागलं आहे,’ असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.
‘आज मराठा आरक्षणावर कोणतीही स्थगिती नाही, तसंच वकीलही पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा मराठा समाज ओळखून आहे,’ अशी टीका सावंत यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी ५० बलिदाने होत असताना, उच्च न्यायालयात फडणवीस सरकारने शपथपत्र दाखल करण्यास ३ वर्ष लावली आणि शिवस्मारकात गैरव्यवहार सुरू असताना गप्प राहणाऱ्या खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास स्वत:च केव्हाचा गमावला आहे’, असंही सचिन सावंत म्हणाले.
#मराठाआरक्षण बाबत @CMOMaharashtra आणि @AshokChavanINC सर्वांना विश्वासात घेऊनच पावले उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असून, त्यामुळे छुपी कारस्थानं करणाऱ्या व मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 8, 2020