नागपूर : देशस्तरावर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनेक ठिकाणी अनलॉक करण्यात आले होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा काही दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता नागपूरमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन केले जाणार का ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करत आहेत. यासाठी त्यांनी लॉकडाऊनचा एक आराखडा सर्व प्रशासकीय खात्यांकडून मागवला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असा आराखडा तयार करायला अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यानंतरच लॉकडाउनच निर्णय होईल. नागपुरात तीन हजारच्या वर कोरोना रुग्ण झाले आहेत आणि 55 मृत्यू झाले आहेत. जोपर्यंत याधर्तीवर आराखडा बनत नाही तोपर्यंत लॉकडाऊन करण्यातही अर्थ नाही.
लॉकडाऊन करण्याआधी लोकांना तयारीसाठी 1 आठवडा देणार दिला जाईल, असेही ते म्हणाले.