मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. कोवि़ड-19 च्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार आहे. विरोधकांकडून किमान 2 आठवड्यांचे अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन दिवसीय अधिवेशनामध्ये 6 अध्यादेश आणि 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. याच महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या शक्ती विधेयकाचा देखील समावेश आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या एक दिवस आधी विरोधीपक्षाने पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला चांगलेच घेरले. विरोधी पक्ष भाजपने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार देखील बहिष्कार टाकला.
आजपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेतही विरोधकांनी दिले आहेत.