देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्शवभूमीवर सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयांना तसेच क्वारंटाईन सेंटर्सला भेट येऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच या परिस्थितीचा आढावा घेऊ त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत आहेत, सरकारचे व्यवस्थापन नीट नसल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील ठाकरे सरकारला वेठीस धरले आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
‘मुख्यमंत्री हे फक्त मातोश्री पुरतेच मर्यादित आहे.’ अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. मुख्यमंत्री फक्त दर महिन्याला लॉकडाऊन वाढवत नेत आहेत, पण दर महिन्यात येण्या समस्या मात्र सोडवत नाही. यामुळे हातावर पोट असलेल्या हाल होत आहे याकडे देखील मुख्यमंत्र्यांचे लक्ष नाही. या वाढत्या लॉकडाऊनमुळे लोकांची उपासमार होत आहे. राज्याची अवस्था दयनीय झाली आहे. असा जोरदार हल्लाबोल नारायण राणे यांनी मुख्यंमत्री ठाकरे यांच्यावर केला आहे
‘महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय अधिकाऱ्यांचा ताब्यात आहे. मंत्रालयातील अधिकारी आदेश काढतात आणि मागेही घेतात. त्यामुळे आता जनतेला कोणी वाली उरला नाहीये. आज राज्यात अनेक जण मृत्यू पावले पण त्याची चिंता देखील मुखमंत्र्यांना नाही. अशी जहरी टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तसेच राणे यांनी पोलीस दलाच्या बदलीच्या पार्श्वऋण देखील मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘ लोकांच्या प्रश्नासाठी सरकारच्या बैठका होत नाहीत तर बदल्या करणे त्या बदल्या रद्द करायला लावणे यासाठी बैठक होतात’, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.