मुंबई : लॉकडाऊनचे नियम शिथिल होण्यासोबतच अनेक सेवा हळूहळू राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकल रेल्वे सेवा करण्याचा निर्णय देखील अखेर घेण्यात आलेला आहे. मात्र शाळा सुरू झाल्या असल्या तरी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने अद्याप घेतलेला नाही.
महाविद्यालय कधी सुरू होणार ? असा प्रश्न सातत्याने विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. आता प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरू करण्याची विद्यापीठांना अनुमती द्यावी, अशी मागणी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता तसेच राज्यातील 20 विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. यावेळी ही मागणी करण्यात आली.
विद्यापीठांनी आपली शैक्षणिक वर्षे अगोदरच सुरू केली आहेत व ऑनलाईन पद्धतीने वर्गदेखील होत आहेत. आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. अशा वेळी महाविद्यालयीन वर्ग सुरू करता येतील का किंवा पाळीमध्ये चालवता येतील का, याचा विद्यापीठांनी विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले.
या बैठकीत विद्यापीठांमध्ये संवैधानिक पदांशिवाय शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जवळजवळ 50 टक्के पदे रिक्त असल्याचे काही कुलगुरूंनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
Read Also :
- ‘काकां’मुळे सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय लागली – अजित पवार
- ‘मतांसाठी राजीव, इंदिरा गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने…’ राममंदिराच्या निधीवर भाजपचे प्रत्युत्तर
- शिक्षण खात्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
- दिल्लीतील स्फोटानंतर अजित पवारांची गृहमंत्र्यांशी चर्चा, सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश
- राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही अयोध्येला जाणार; महापालिका निवडणुकीसाठी युतीची चिन्ह?