मुंबई : महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली रक्कम हि खूप अपुरी आहे कारण जमीन वाहून गेलीय, विहिरी ढासळल्या आहेत. पीक संपली आहेत. त्यामुळे हि रक्कम फार कमी आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून भरीव मदत मिळवून घ्यायला हवी, ज्या पद्धतीने केंद्र बिहारला तातडीनं मदत करत तसच महाराष्ट्रालाही करावी, विरोधी पक्षांनी म्हणजे भाजपने केंद्राकडे जाऊन मदत आणावी अस वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या पॅकेजची घोषणा आज करण्यात आली आहे. जवळपास १० हजार कोटी रुपयांची मदत आता महाविकासआघाडी सरकार शेतकऱ्यांना करणार आहे. यामध्ये फळबाग आणि इतर पिकांचे निकष ठरवून दिलेले आहेत. शेतीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार तर फळबागेसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी जाहीर करण्यात आले आहे.
पण आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे, किमान शेतकर्यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे.
नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली, फसवणूक केली. असा आरोप त्यांनी केला आहे.
Read Also :
खडसेंवर अन्याय झाल्यानेच ते राष्ट्रवादीत: धनंजय मुंडे https://t.co/iHkuv9NHPQ @dhananjay_munde @NCPspeaks @EknathGKhadse
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 23, 2020