मुंबई : प्रतापगडावर राज्याचे मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना थेट एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली. त्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धारेवर धरलं. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी..! नागपुर येथील आरएसएसचं मुख्य कार्यालय उडवून देण्याची धमकी
शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून मंगल प्रभात लोढा यांनी जर दिलगिरी व्यक्त केली असेल तर हा विषय आपण संपवा. कारण राज्यात महागाई, बेरोजगारी, यांसोबत आता रिझर्व्ह बॅंक बाजारात नवीन चलन आणत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आता आपण चर्चा केली पाहिजे. अशीही प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं. पण स्वराज्यसाठी ते बाहेर पडले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं. पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले. मंगल प्रभात लोढा यांच्या या वक्तव्याने आता राज्यात याचे पडसाद उमटायला सुरूवात झाले आहेत.
Read also
- “संजय राऊतांनी राजकारण करावं, पण त्यात देवाला ओढू नये”; नवनीत राणा
- “राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण”; राज ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल
- “गुवाहाटीत शिंदे गटातील आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रूपये देण्यात आले ;” माजी खासदाराचा दावा
- वाचाळवीर थांबता थांबेना..! आता शिंदे गटातील आमदारांनी महाराजांच्या गिनीमी काव्याची केली तुलना
- वाचाळवीर थांबता थांबेना..! आता शिंदे गटातील आमदारांनी महाराजांच्या गिनीमी काव्याची केली तुलना