औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. मात्र यानंतर सरकारने अद्याप कोणतेही ठोस पावले न उचलल्याने मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. राज्यातील विविध विभागातील परीक्षा देखील पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. आता मराठा आरक्षणासाठी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताच्या सह्याचं पत्र लिहिण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी रक्ताने सह्या केलेले पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना टार्गेट करता, आम्ही हे खपवून घेणार नाही, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पंकज जऱ्हाड यांनी संजय राऊत यांना दिला आहे. दिला.