मुंबई : भाजप – शिवसेना सरकारच्या काळात दिलेलं मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरणात तापलेलं आहे. मराठा समाज आणि मराठा तरुणांमध्ये सरकारविरोधात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
यातच आता महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ईतिहासात मराठे पानिपतच्या लडाईत हरले आता दुसरं सामाजिक पानिपत होण्याची शक्यता आहे, असं गंभीर वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
सातारामध्ये मराठा समाजाची गोलमेज परिषद सध्या सुरू आहे. त्या परिषदेत बोलताना आ. भोसले यांनी ही आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा तसेच राज्य सरकारने MPSC च्या व मेगाभरतीतही कुठलीही गडबड न करता पारदर्शकतेने या परिक्षा घ्याव्यात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठा समाज कधीही एकत्र येत नाही अस नेहमी बोललं जातं. पण आता मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्यासाठीची गरज निर्माण झाली आहे. आपण वेगवेगळे लढलो तर पानिपतच्या ईतिहासाची पुनरावृति होण्याची शक्यता ही त्यांनी वर्तवली आहे.
Read Also :
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ‘राज्यपाल नियुक्त आमदारां’ची यादी स्विकारणारच नाही- मंत्री हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट https://t.co/MUIRPcxqon @mrhasanmushrif @CMOMaharashtra @BSKoshyari
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020