नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक सुमारे एक तासाहून अधिक वेळ बैठक सुरु चालली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे..
ठाकरेंची महाराष्ट्र सदनमधून पत्रकार परिषद
भेट अधिकृत होती
पावणे दोन तास बैठक झाली
पंतप्रधान मोदी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक
मांडलेली मुद्दे मोदींनी ऐकून, समजून घेतली
सकारात्मक पद्धतीने मोदी ते मुद्दे सोडवतील
पंचायत राज मधील आरक्षणाचा विषय मांडला
मेट्रोच्या विषयावर चर्चा केली
विम्याच्या अटी तटी वर चर्चा केली
महाराष्ट्रातील चक्रीवादळाच्या मुद्यावर चर्चा झाली
यावरील मदतीचे निकष बदलने गरजेचे आहे
मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली
पदोन्नती आरक्षण, ओबीसी आरक्षणावर चर्चा केली
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या
कारशेड बाबत चर्चा केली
मराठा आरक्षणाबाबत प्रतिकूल निर्णय घेण्यात आला
राज्याला आरक्षण देण्याचा हक्क राहिला नाही
५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडला येणार नाही
राज्याला अधिकार द्या अस आम्ही म्हणत नाही
परंतू, ५० टक्क्यावर आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे
सुप्रिम कोर्टात याबाबत मुद्दा उपस्थित केला पाहिजे
आम्हाला अधिकार देताना ५० टक्क्याची मर्यादा शिथिल करण्यात यावी
केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा नाही
सर्वजातीय समाजाचा हा मुद्दा
जो पर्यंत ५० टक्के मर्यादा शिथिल होत नाही, तो पर्यंत अधिकार केंद्रकडेच.
केंद्राने पुढाकार घ्या
समाजाला न्याय देणे गरजेचे
केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेवून प्रश्न मार्गी लावाला
कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल कऱण्यात यावी
आम्हाला दीस तास चर्चोसाठी दिला
मराठा आऱक्षणाबाबत चर्चा केली
स्थानिक प्रशासनातील जागांवर परिणाम झाला
स्थानिक प्रशासनातील ५६ हजार जागांवर परिणाम
ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळणारच नाही
घटनेमध्ये दुरुस्ती करून कायमस्वरुपी मार्ग काढावा
५० टक्क्याची मर्यादा शिथिल करावी
२०२१ मध्ये ओबीसीची स्वतंत्र जणगणना करण्यात यावी
मोदींनी सर्व विषय गांभिर्याने येकले
बीड मॉडेल राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना लागू करावे
त्याबाबत केंद्रला पत्र दिले आहे
पदोन्नती आरक्षणाबाबत चर्चा केली
नैसर्गिक आपत्तीचे निकष बदलून शेतकऱ्यांना मोठी मदत केली
नैसर्गिक आपत्तीवर मार्ग काढावा
समुद्र किनाऱ्या नजिकच्या शहरांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे
२४ हजार ६०० कोटींचा परतावा केंद्राने द्या
आरक्षण कायम ठेवण्यासाठी केंद्राने मार्ग काढावा
पंचायत राज्याचे थकीत जीएसटी परतावा तात्काळ द्या
वित्त विभागाकडील २४ हजार ६०० कोटींचा परतावा तातडीने मंजूर करावा
वित्त विभागाकडील २४ हजार ६०० कोटींचा परतावा तातडीने मंजूर करावा
मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे
पायाभूत सुविधांसाठी केंद्राने मदत करावी
राज्याला चक्कीवादळाच वारंवार फटका बसतोय
राज्याला जीएसटी परतावा द्या
एकूण १२ मुद्दे मोदींसमोर मांडले
मुद्दे तपासून त्याबद्दल हालचाली करणार
पंतप्रधानांनी ठाकरेंना सांगितले
मोदी अत्यंत सकारात्म होते
पंतप्रधानांना कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करण्याची विनंती केली
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाऊले उचलावी
राज्याला अधिकार मिळावेत
केवळ अधिकार देवून चालणार नाही
घटनादुस्ती गरजेची आहे
असे मुद्दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी मांडेल