मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत असून, राज्यात करोना लसींचा देखील तुटवडा जाणवू लागल्याने अनेक लसीकरण केंद्रांमधील लसीकरण थांबवण्यात आले आहे.
तसेच, राज्यात सध्या असलेला करोना लसींचा तुटवडा, गेल्या दोन महिन्यांपासून आणि खासकरून गेल्या २ दिवसांत करोना बाधित रुग्णांची राज्यभरात वाढलेली संख्या, त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा उडालेला गोंधळ, त्यातून निर्माण झालेली भयंकर परिस्थिती, इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांची जाणवत असलेली कमतरता, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अजित पवार, राज राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे मोठे नेते उपस्थित असून, देवेंद्र फडणवीसांनी राज्यात संपूर्ण लॉक डाऊन करण्याला विरोध दर्शवला आहे. राज्यातील सर्व स्तरांतील आणि घटकांतील नागरिकांचा विचार करून निर्णय, निर्णय घेण्यात यावा असं त्यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच संपूर्ण लॉकडाऊनला योग्य पर्याय शोधून काढण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्याने नागरिकांना मदत केली पाहिजे असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले म्हटले असल्याचे कळते आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात करोना संक्रमणामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.