मुंबई : ज्यावेळी मुंबईवर कोणती आपत्ती येते त्यावेळी पहिल्यांदा शिवसेना धावून जातो. अनेकदा भाजपकडून सामानामधील घटनांवर टिका केली जाते. मात्र सामानामध्ये जे काही येतं ते हिंदुस्थानतील जनतेच्या हितासाठी येतं आणि ते येणारच. तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं. की याला केंद्राची सुरक्षा असताना याच्यावर हल्ला झाला कसा? त्यासाठी सुरक्षा तुमची होती. त्याला विचारा. ती स्वासची बाटली दिली कोणी विचारा त्यांना, असं खडेबोल देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं. आम्ही संयम बाळगतो म्हणजे नामर्दांची औलाद नाही. एक तर आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पंरतु कोणी अंगावर आलं तर त्याला सोडत नाही. हे आमचं हिंदुत्व आहे, हे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे य़ांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मला अलिकडेच एका शिवसैनिकांनी विचारलं की, साहेब तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का ? म्हटलं संबंध काय मुन्नाभाईचा. त्यातं संजय दत्तला गांधी दिसल्याने तो गांधीगिरी कारायला लागतो. तशी केस आपल्याकडे आहे. त्याला स्वत: ला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. शाल घेऊन फिरतात हल्ली. कधी मराठीच्या नादाला लागतात. कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर तो मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करीत होता. हा कुठला मुन्नाभाई काढला तु, शेवटी त्या संजय दत्तला कळतं की, आपुन के भेजे में केमिकल लोचो झालाय. ही केमिकल लोचोची केस आहे. हा पिक्चर सत्य घटनेवर आधारीत आहे. असे मुन्नाभाई फिरताहेत त्यांना फिरू द्या असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडचे कोविड परिस्थितीबाबत एक सभा घेतली. त्यात पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलायलं लावलं होतं. मी आपलं आयपीएल मॅचसाऱखं बघत होतो. मला त्या बैठकीत बोलायचं नव्हतं. त्यावेळी त्यांनी महागाईवर एक उपाय सांगितला की, पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करा. तुम्हाला मुंबई फक्त ओरबडण्यासाठी पाहिजे आहे. असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.
मुंबई तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो मर्द मराठा लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. मुंबई ते अहमदाबाद जी बुलेट ट्रेन आणली जात आहे. त्याचा उपयोग काय ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आरएसएसचं स्वांतत्र्य लढ्यात कुठेही दिसली नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी जो लढा सुरू होता. त्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात देखील तुम्ही कुठे होता. ? असा सवालही त्यांनी केला.