मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून मोठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी या नियुक्तींच्या प्रस्तावाला राज्यपालांकडून नकार दिला जाणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर आता यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री हसन मुश्रीफांचा हा दावा पुर्णतः खोटा असून त्या सर्व गावगप्पा आहेत, मंत्रीपदावर विराजमान असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने तरी असं बोलू नये, मात्र जे काम आपल्याला झेपत नाही त्याबद्दल मोठा अपप्रचार करण्याची राष्ट्रवादीची पद्धतच असल्याचा घणाघात भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले होते?
महाविकास आघाडी सरकारने सुचवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे स्विकारणारच नाही, असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा आधार देत त्यांनी म्हटलंय कि, माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं या विषयावर बोलणं झालं असून याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींशीही चर्चेत झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली आमदारांची यादी राज्यपाल बाजूला काढून ठेवणार आहेत, अशी माहिती मिळाल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर काही महिन्यांतच या नेमणुका होणार होत्या पण राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारशी विनाकारण केलेल्या संघर्षामुळे या नेमणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
Read Also :
एकनाथ खडसेंनी केली ‘सर्जिकल स्ट्राईक’; भाजपचे 60 जण राष्ट्रवादीत https://t.co/spi3cZbUPP @EknathGKhadse @BJP4Maharashtra @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020