बोगस बियाणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे. यावरून आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी अमरावतीच्या चांदूर चांदूर बाजार तालुक्यातील शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्यात महाबीजनेच मार्केट मधलं सर्वात हलकं बियाणं घेतलं आणि त्याला ज्यादा दराने विक्री केल्याचा गंभीर आरोप केला.
बच्चू कडू म्हणाले की, बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल, पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत. तहसीलदार, तालुका कृषी जिल्हाधिकारीदेखील सोबत आहेत. शेतीची सार्वत्रिक तपासणी करण्यात येईल. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाईल.
राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘दरवर्षी अशीच स्थिती आहे. ५० वर्षांत परिस्थिती जराही बदलेली नाही. बियाणं चांगलं मिळालं, असं एक वर्षही जात नाही. बियाणे कंपनीचे मालक आहे त्यांना चोपल्या शिवाय हे बंद होणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.