कोरोनाचे संकट आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव यामुळे देशात असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोणताही धोका नको म्हणून शाळा, महाविद्याल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द केल्या. मात्र कोविड-१९मुळे ज्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत अशांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापीठांत दिसून आला. यानंतर विद्यार्थी आणि पालक यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून असे काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत चौकशी करुन कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. प्रसार माध्यमांनी विषय उचलून धरताच ही चूक ज्यांनी केलीय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. तसेच २४७ विद्यार्थ्यांना दिलेली कोविड- १९ ची प्रमाणपत्रे परत घेतली जातील आणि त्यांना कोविडचा शिक्का नसलेली नवीन प्रमाणात दिली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. काही विद्यार्थ्यांची परीक्षा झाली होती. मात्र, कोरोनाचा फैलाव सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे वर्षाभरातील सरासरी गुणांची लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुण देत गुणपत्रिका देण्यात आल्या. मात्र, काहींच्या गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ चा शिक्का मारण्यात आला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांतर कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.