महाराष्ट्रासह देशात गाजलेल्या कोपर्डी प्रकरणाला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत . या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट आली होती . १३ जुलै २०१६ च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपीना फाशी देण्यात आलेली नाही त्यामुळे या नराधमांना लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे
‘कोपर्डी घटनेला आज ४ वर्ष झाली तरी आमच्या बहिणीला अजून न्याय मिळालेला नाही. उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नसतो. त्या हरामखोरांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे’, अशी मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर केली आहे.कोपर्डीतील १५ वर्षे वयाच्या शालेय मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या घटनेचे ४ वर्षांपूर्वी राज्यभर पडसाद उमटले होते. त्यानंतर गावालगतच्याच वस्त्यांवर राहणारे जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीचंद भैलुमे (२६) या तिघा आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज या घटनेला ४ वर्ष पूर्ण झाले तरी देखील मुलीला न्याय मिळाला नाही. याबाबत निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.
कोपर्डी घटनेला आज ४ वर्ष झाली तरी आमच्या बहिणीला अजून न्याय मिळालेला नाही. उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नसतो. त्या हरामखोरांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2020