मुंबई : मंगळवारी मनसेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता वांद्रेतील MIG क्लब इथं ही बैठक होणार आहे. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडील अहवालाच्या स्वरुपात पक्षाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थानिक स्तरावरील निवडणुका आणि पक्षाची तयारी, पक्ष संघटन आणि बांधणी, स्थानिक स्तरावर राजकीय आणि सामाजिक स्थिती, लोकांचा कल, पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मनसेकडून कम बॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेच्या जुन्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी 7 डिसेंबरला ‘कृष्णकुंज’वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी नवीन वर्षात नाशिक दौरा करणार असल्याचे सांगितल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला आहे. त्यात आता महापालिकेच्या चिटणीस विभागानं नगरसेवकांना पाठवलेल्या स्मरणपत्राची भर पडली आहे. महापालिकेच्या ऑनलाईन सभांमध्ये अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठरण्याची वेळ येऊ शकते, असं स्मरणपत्र पाठवण्यात आल्यानं दोन्ही पक्षात पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुंबई महापालिकेच्या चिटणीस विभागानं विविध पक्षातील सात नगरसेवकांना पत्र पाठवलं आहे. त्यावरुन पालिकेतील चिटणीस विभागाला हाताशी धरुन पालिकेत काँग्रेसला अडचणीत आणले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
Read Also
अंकिता पाटील यांनी राज्यसभेच्या खासदार सौ. प्रियंका चतुर्वेदी यांची सदिच्छा घेतली भेट
“हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार”; भाजपचा ठाकरे सरकारला टोला