जळगाव : कोणत्याही पक्षावर नेत्यांवर टिका टिप्पणी करणे हा भाजपचा मुळ स्वभाव आहे. कुठेही भाषणाला उभे राहिले तर पहिल्यांदा राहुल गांधी यांच्यावर टिका करणार, कॉंग्रेसवर टिका करणार. त्यांना सांगावं लागेल राहुल गांधी किंवा त्यांचे कुटुंब त्यांंनी या देशासाठी प्रचंड त्याग आणि सेवा केली. असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली. महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा..“खायचं कसं ? म्हणूनच अजितदादांकडे अर्थखातं,”ओमराजे निंबाळकरांची जोरदार फटकेबाजी
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याआधी आयुष्याची १२ ते १३ वर्ष इंग्रजांच्या तुरूंगात घातली. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये योग्य दृष्टीने यावा, म्हणून संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारली. जगामध्ये भारताचे नावलौकिक वाढेल, याची त्यांनी काळजी घेतली. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिराजी गरीब माणसाच्या प्रश्नांसाठी आयुष्य झोकून देण्याचं काम इंदिराजींनी त्या काळामध्ये केलं. अशी अनेकांची नावे घेता येतील, मग ते नरसिंहराव असतील किंवा अलीकडच्या काळातील डॉ. मनमोहन सिंग असतील. या सगळ्यांनी देशासाठी योगदान दिलं आणि या सगळ्यांकडे गांधी नेहरूंचा विचार होता आणि त्या विचारांनी अभिमान ठेवला पाहिजे, त्यांचा अभिमान न ठेवता त्या विचारावर आणि त्या नेतृत्वावर व्यक्तिगत हल्ले करण्याचा काम आज देशाचे प्रधानमंत्री हे सातत्याने करत आहेत, हे देशाच्या दृष्टीने चांगलं नाही. असेही ते म्हणाले.
दरम्यान, आम्हा लोकांवर ते टीका करणार हा त्यांचा धर्मच आहे. मी काय, उद्धव ठाकरे काय , प्रत्येक भाषणामध्ये आमच्यावर काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. त्यामुळे आम्हा लोकांवर टीका करतात ठीक आहे. आज पण त्यांनी हा देश मुक्त होण्यासाठी इंग्रजांच्या तावडीतून ज्या कुटुंबाने कष्ट केले त्याग केला आणि स्वातंत्र्य मिळवल्यानंतर या देशाचा चेहरा बदलेल कसा, याची काळजी घेतली अशा व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याचा सोडून आज मोदी साहेब फक्त टीकाटिपणी करत आहेत. याचा अर्थ जे पद त्यांच्याकडे आहे. त्या पदाचा गरीमा, त्या पदाची प्रतिष्ठा ही घालवण्यासंबंधीचं काम आज त्यांच्याकडून होत आहे. बेकारीचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कामगारांचा प्रश्न असो, कशातही त्यांचं लक्ष नाही. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा
हेही वाचा..“बारामतीच्या सूनबाईंना खासदार म्हणून दिल्लीत पाठवा”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार, अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी”,- मुरलीधर मोहोळ
हेही वाचा…“बारामतीसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही”, देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द
हेही वाचा…आढळरावांसाठी भाजपच्या वतीने भोसरीत बैठकांचा सपाटा, महेश लांडगे मैदानात