सेनेचा बालेकिल्ला समाजाला जाणाऱ्या कोकणात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला नारायण राणे यांच्या कडून सपाटून पराभव पाहावा लागला. माझ्यामुळेच कोकणामध्ये शिवसेनेला महत्व होते.असे बोलत राणे यांनी कोकण म्हणजे आपलाच बालेकिल्ला असे दाखवून दिले. भाजपाला या संधीचा फायदा करून घेण्यासाठी नारायण राणे यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली तसेच निलेश राणे यांची भाजप प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली.
काही दिवसापूर्वी ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांच्या सुरक्षेत कपात केली होती. यामध्ये नारायण राणेंचा देखील समावेश होता. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर भाजपने जोरदार टीका केली होती. मात्र आता नारायण राणेंना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
नारायणे राणे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेऊन काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. राणेंना देण्यात आलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेत 12 सी. आय. एस. एफचे जवानांचा समावेश असेल. महत्त्वाचे असणारे मात्र तुलनेने कमी धोका असेलेल्या व्यक्तींना ही सुरक्षा दिली जाते.
तर दुसरीकडे नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली असून, त्यांची भाजप प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून निलेश राणे हे आघाडी सरकारच्या महत्वाच्या नेत्यांवर जोरदार टीका करत आहेत. त्याचा फायदा भाजपाला आगामी निवडणुकीत करून घ्यायचा असल्याने त्यांना राज्याच्या भाजप प्रदेश सचिवपदी निवड केल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.