चंद्रपूर – शेतकऱ्यांनी केलेल्या तब्बल वर्षभराच्या आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वत: आज सकाळी देशातील जनतेला संबोधित करत याबाबतची घोषणी केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाने विरोधकांकडून शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणूक जवळ आली आहे. तिथे भाजपचे प्रतिनिधी गेले असते तर त्यांना शेतकऱ्यांनी विचारलं असतं. शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका निवडणुकीत बसला असता म्हणून भाजपने कृषी कायदे मागे घेतले, असा दावा पवारांनी केला. तसेच केंद्र सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असाही सणसणीत टोला त्यांनी लगावला.
समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार? जात प्रमाणपत्राची पडताळणी सुरू
“कृषी काद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून जो संघर्ष झाला त्या संघर्षात उत्तर प्रदेशचा काही भाग, राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागातील शेतकरी अधिक प्रकर्षाने उतरले होते. आता पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपचे प्रतिनिधी गावात गेल्यानंतर शेतकरी त्यांना विचारतील, त्याची किंमत चुकवावी लागेल हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी हे कायदे रद्द करण्याचा निर्णय झाला. ठिक आहे, उशिरा का होईना शहाणपण आलं. त्याबद्दल मी दु:ख व्यक्त करत नाही. पण एक वर्षभर आपल्या प्रश्नांसाठी शांततेच्या मार्गाने संघर्ष करणाऱ्या संबंध सलाम करतो, त्यांचं अभिनंदन करतो”, असं शरद पवार म्हणाले
अनिल देशमुखांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग बंद? सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
कृषी क्षेत्र हा देशाचा आत्मा आहे. अन्नधान्यची लागवड करणारा शेतकरी आणि शेती संबंधित कायदे करायचे असतील तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा राजकीय विषय नाही. पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. हे कायदे शेतीच्या अर्थव्यवस्थेत काही समस्या निर्माण करण्यासाठी तयार केले होती की काय, अशी शंका अनेकांच्या मनात होती. त्यामुळे हे कायदे झाले पण त्या कायद्यांना विरोध झाला होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी देशाच्या राजधानी दिल्लीच्या सीमेवर एक वर्ष ऊन, वारा, पाऊसचा विचार न करता आंदोलन करतात. सरकारने चर्चा करुन मार्ग काढण्याची गरज होती.
Read Also :
- “कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
- ‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कृषी कायद्यावर प्रतिक्रिया
- असं काय झालं की तीन कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागली?
- ‘अधिकाऱ्यांना मॅनेज करून दाऊदचे झाले ज्ञानदेव’; मंत्री मलिकांचा पुन्हा गौप्यस्फोट
- “कितीही मोठ्या अहंकारी शासनाला जनता झुकावू शकते, हे पुन्हा सिद्ध झाले”