मुंबई – आर्यन खान प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध एनसीबी, केंद्र सरकार असा संघर्ष जणू पाहायला मिळत आहे. आर्यन खान याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा पाय खोलात असल्याचे चित्र आता समोर आले आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे दिवसेंदिवस समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत एका मागून एक पुरावे आणत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणत आहेत. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई महापालिकेत नोंद असलेले दाऊद वानखेडे हे नाव बदलण्यासाठी दाऊद वानखेडे यांनी अधिकाऱ्यांना मॅनेज केले होते. त्यांनी त्यांचे नाव बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती मलिक यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे.
खोट्या केसमध्ये वडिलांना तुरूंगात टाकलं, भाऊ बेपत्ता आहे, आम्हाला न्याय द्या; तरूणीने टाहो फोडला
मलिक यांनी म्हटलं आहे की वानखेडे यांनी नाव बदलण्यासाठी २७ एप्रिल १९९३ रोजी एक प्रतिज्ञापत्र महापालिकेत दिले होते. जीवन जोगुरे, आणि चौधरी या दोघांनी हे प्रतिज्ञापत्र केले होते. दाऊद वानखेडे हे नाव नसून ज्ञानदेव वानखेडे हे नाव आहे असं देखील त्यात म्हटलं होतं. त्यावेळच्या अधिकाऱ्यांना दाखवून हे सर्व मॅनेज करण्यात आलं. जन्मदाखल्यावर स्टार करून बाजूला ज्ञानदेव लिहिण्यात आले. त्याआधारे जन्मदाखला तयार करण्यात आला होता. दोन शाळेंच्या दाखल्यांवर दाऊद हेच नाव आहे. तसेच धर्मही मुस्लिम होते. पण शाळांचे रेकॉर्डही बदलण्यात आले.
१९९५ मध्ये मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. ही बनावट कागदपत्रे दाखवून एससीचे जात प्रमाणपत्र घेतले. त्याआधारे महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर स्पर्धा परिक्षांमध्येही याअंतर्गतच सर्व फायदे घेतले. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली, असा आरोप मलिकांनी केला आहे. आता पुढे काय घडामोडी होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
Read Also :
- “कितीही मोठ्या अहंकारी शासनाला जनता झुकावू शकते, हे पुन्हा सिद्ध झाले”
- केवळ घोषणा करून उपयोग नाही, कृषी कायदे संसदेत मागे घेतले तर त्याला अर्थ – प्रकाश आंबेडकर
- “कृषी कायदे मागे घेतले त्याप्रमाणेच एकदिवस ED, CBI चा गैरवापर केंद्राने थांबवावा”
- एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार ही तर एक अफवा – माजी मंत्री सदाभाऊ खोत
- सात वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारनं पाय मागे घेतलाय; नवाब मलिकांची संतप्त प्रतिक्रिया