मुंबई : केंद्र सरकारने मागील वर्षी संसदेत आपल्या संख्याबळाचा वापर करत शेतकऱ्यांच्या संबंधीचे तीन कायदे संसदेत मंजूर करून घेतले होते. या कायद्यांची अंमलबजावणी होण्याआधीच हे कायदे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. संसदेत या कायद्यांवरून मोठा गदारोळ माजला होता. खुद्द भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनीही त्यावेळी राजीनामे दिले होते.
अनिल देशमुखांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग बंद? सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
साधारण गेल्या एक वर्षांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता यश आल्याचं दिसून येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले आहेत. आम्हीच तुम्हाला सांगताना कुठेतरी कमी पडलो अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. आता यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राज्यचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या घोषणेनंतर शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं असून शेतकऱ्यांनी मोदी सरकारला झुकवले असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
आज सकाळी झालेल्या पत्रकारपरिषदेत नवाब मलिक यांनी या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले आदरणीय मोदीजींना लोकांना संबोधित केलं, आपल्या कामांची माहिती दिली आणि घोषणा केली की तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. आजपासून हे तिन्ही कायदे देशात राहणार नाहीत असं मलिक म्हटले आहेत. याबद्दल मी सगळ्यात आधी सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो. गेल्या वर्षभरापासून आपण आपल्या मागण्यांवर ठाम राहिलो आहोत. कितीही प्रयत्न केले गेले तरी मागे हटले नाही, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, आतंकवादी असल्याचा ठपका ठेवण्यात आला तरीदेखील त्यांनी सात वर्षात पहिल्यांदा मोदींना झुकवले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही – किरीट सोमय्या
त्यांनी हे दाखवून दिल की देश एकजूट असेल तर कुठलाही हुकमी निर्णय बदलता येतो. मलिक पुढे म्हणाले, आम्ही हीच गोष्ट वारंवार सांगत होतो की सरकारला जसा कायदे करण्याचा अधिकार आहे तसंच कायदे मागे घेण्याचाही अधिकार आहे. आम्ही म्हणत होतो की नव्याने सुरुवात करुन चर्चा करायला हवी. पण निवडणुका जवळ आल्या हे स्पष्ट होऊ लागलं की भाजपा आता हरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निवडणुकांमध्ये हरण्याच्या भीतीने पंतप्रधानांनी तिन्ही कायद्यांना मागे घेतलं. मी सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो. तुमचा विजय हा देशाचा विजय आहे. या आंदोलनात जे शेतकरी शहीद झाले, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत आहे. पुन्हा एकदा सांगतो, देशातला शेतकरी महान आहे. त्यांनी मोदीजींना झुकवलं”.
Read Also :
- मोदी सरकार देर आये, दुरुस्त आये; शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय – अमोल कोल्हे
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; वादग्रस्त तीनही कृषी कायदे रद्द
- योगेश बहल यांचे राजकारण : विरोधात गेल्या दोन बायका अन् फजिती ऐका !
- अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचे अडथळे; सीबीआयचा गंभीर आरोप
- देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात अजून का नाही? – देवेंद्र फडणवीस