पिंपरी- चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक योगेश बहल यांनी खासगी न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर बेछुट आरोप केले. महत्त्वाची पदे उपभोगूनही पक्षात आणि शहराच्या राजकारणात मानपान मिळत नसल्यामुळे बहलांची उद्वीघ्नता वारंवार पुढे येते. वास्तविक, पिंपरीतील राजकारणात प्रभावी ठरलेल्या दोन बायका थेट विरोधात गेल्यामुळे बहलांची कोंडी झाली असून, राजकीय फजिती झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; राज्यात ७१३० जागांसाठी निवडणूक होणार
पिंपरी-चिंचवडच्या राजकीय मातीत गाववाला आणि बाहेरचा, गावकी-भावकीची बीजे इतकी रुजली आहेत की, या मातीत भल्याभल्यांना चितपट व्हावे लागले आहे. राष्ट्रवादीचे मातब्बर नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये सहभागी असलेले योगेश बहल यांनी नगसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, विरोधी पक्षनेता अशी महापालिकेतील सर्व मानाची पदे भूषवली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांच्या जबाबदारी होती. मात्र, बहल यांना पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. उच्चशिक्षण आणि क्षमता असूनही आमदार-खासदार होता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
“विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
२०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता आली. त्यावेळी पहिल्यांदा योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेता पदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र, विरोधी पक्षनेता असताना बहलांनी भाजपाविरोधात चकार शब्द काढला नाही. त्यानंतर तीन वर्षे बहल वैयक्तीगत कामात व्यस्त होते, असे मान्य करतात. दुसरीकडे, भाजपाच्या सत्ताकाळात स्मार्ट सिटी, स्पर्श हॉस्पिटलसह अन्य कामांतील भ्रष्टाचाराबाबत आरोपही करतात.
कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
खरे पहता, महापालिका आयुक्त राजेश पाटील राज्य शासनाचे नियुक्त अधिकारी आहेत. स्मार्ट सिटीत राष्ट्रवादीचे संचालक आहेत. त्यापैकी एकानेही स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावर आवाज काढलेला नाही. स्पर्श प्रकरण सुरूवातील भाजपाच्या नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणले. आता श्रीकृपा नावाच्या संस्थेवरुन बहल आक्रमक झाले आहेत. मात्र, आयुक्त महाविकास आघाडी सरकारच्या सूचनेनुसार काम करीत आहेत. मग, बहल ही कामे थांबवू शकत नाहीत का? असा प्रश्न आहे.
अजितदादा पाण्याच्या टाकीचे काम थांबवू शकतात, मग हे का नाही?
योगेश बहल हे अजित पवार यांच्या विश्वासातील आहेत, असे सांगितले जाते. इंद्रायणीनगर येथे सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार अजित पवार यांनी थांबवले होते. तसा खुलासाच प्रशासनाने दिला होता. लोकांच्या हिताचे असलेले काम अजितदादा थांबवू शकतात. तर योगेश बहल यांच्या अपेक्षेप्रमाणे महापालिकेत सुरू असलेली भ्रष्ट कामे अजिदादा का थांबवत नाहीत? असा प्रश्न आहे. त्यामुळे एकतर अजित पवार यांच्या ‘गुडबॉक्स’मधून बहल बाहेर पडले आहेत किंवा बहल करीत असलेले आरोप खोटे आहेत, असा अर्थ निघतो.
२००९ साली ‘त्या’ठिणगीचा स्फोट झाला…
राष्ट्रवादीच्या महापालिकेतील सत्ताकाळात योगेश बहल- मंगला कदम यांची आपल्या गटातचे वर्चस्व राखले. २००९ साली योगेश बहल यांनी स्थानिक नेत्यांना विरोध करीत भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या समर्थक नगरसेविका मंगला कदम यांना तिकीट आणले होते. स्थानिक आणि बाहेरचा असा वाद निर्माण होवून पडलेल्या ठिणगीचे रुपांतर २००९ साली स्फोटात झाले. त्यावेळी स्थानिक मंडळ एक झाली आणि भोसरीतून अपक्ष विलास लांडे आमदार झाले. वेळीपासून बहल आणि स्थानिक राष्ट्रवादीचे नेते- पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही. ही बाब अनेकदा अजित पवार यांच्या लक्षातही आली आहे. महापालिकेतील सर्व महत्त्वाची पदे उपभोगल्यानंतर केवळ गावकी-भावकी सोबत नसल्यामुळे योगेश बहल यांची राजकीय घोडदौर अडचणीत आली आहे.
शिलवंत-धर अन् पालांडे यांच्यामुळे बहलांची अस्वस्थता…
योगश बहल गेल्या ३०वर्षांपासून ज्या प्रभागाचे नेतृत्व करीत आहेत. त्याच प्रभागात आता भाजपाच्या सुजाता पालांडे आणि राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत-धर यांनी बहलांची कोंडी केली आहे. सुलक्षणा धर यांनी अजित पवार, पार्थ पवार यांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच, सुजाता पालांडे यांनी भाजपात जम बसवला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुलक्षणा शिलवंत-धर यांना तिकीट निश्चित झाले होते. मात्र, आपण राजकारणात आणलेली महिला आपल्याला डोईजड होईल, या अस्वस्थतेतून बहल यांनी विरोध केला. परिणामी, अण्णा बनसोडे यांना तिकीट मिळाले. सुलक्षणा शिलवंत-धर आता बहल यांच्या थेट विरोधात आहेत. पूर्वाश्रमी राष्ट्रवादीत असलेल्या पालांडे याही बहल यांच्या कट्टर विरोधक झाल्या आहेत. दुसरीकडे, आता बहल यांना आपल्या मुलाला नगरसेवक करायचे आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघात वर्चस्व ठेवण्याच्या प्रयत्न योगेश बहल अस्वस्थ झाले आहेत, ही सत्य परिस्थिती आहे.
पिंपरी विधानसभेचे राजकीय गणित
भाजपामधील नगरसेविका सीमा सावळे यांना पिंपरी विधानसभा मतदार संघातून आमदार होण्याची प्रचंड महत्वाकांक्षा आहे. राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत-धर या योगेश बहल यांच्या मदतीने नगरसेवक झाल्या आहेत, असे सांगितले जाते. २०१९ मध्ये शिलवंत यांनी विधानसभेचे तिकीट जवळपास निश्चित केले होते. मात्र, ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी शिलवंत यांची समजूत काढली. आता शिलवंत २०२४ मध्ये पुन्हा तिकीटावर दावा करणार आहेत. त्यामुळे सीमा सावळे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देवून शिलवंत ऐवजी सावळे राष्ट्रवादीच्या उमेदवार करण्यासाठी बहल रणनिती आखत आहेत. विशेष म्हणजे, सावळे यांनी भाजपाविरोधात रान तापवण्यास सुरूवात केली असून, त्याला बहलांची साथ असल्याचे बोलले जात आहे.
Read Also :
- अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचे अडथळे; सीबीआयचा गंभीर आरोप
- देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात अजून का नाही? – देवेंद्र फडणवीस
- शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही – किरीट सोमय्या
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले..!
- परमबीरसिंह ‘वॉण्टेड’ लिस्टमध्ये! ३० दिवसांत पोलिसांसमोर हजर न झाल्यास…