मुंबई – तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे ‘टार्गेट’ दिल्याचा खळबळजनक आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी फरार घोषित केले. परमबीरसिंह यांच्याबरोबरच विनयसिंह ऊर्फ बबलू आणि निलंबित पोलीस रियाझ भाटी यांना ‘फरार’ घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात शनिवारी अर्ज केला होता. ‘फरार’ घोषित केल्यानंतर ३० दिवसांत हे तिघेही उपस्थित न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाईल.
२४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…; एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांना इशारा
बांधकाम व्यावसायिक विमल अगरवाल याने निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे व परमबीरसिंह यांच्याविरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने परमबीरसिंह, विनयसिंह व रियाझ भाटी यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. आरोपींवर एकापेक्षा अधिक अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही ते न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. या आधारावर या तिघांनाही ‘फरार’ घोषित करण्याची विनंती मुंबई पोलिसांनी किल्ला कोर्टाला केली होती.
“कंगणा रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्या”; नाना पाटोले आक्रमक
मुंबई पोलिसांच्या वतीने ॲड. शेखर जगताप यांनी परमबीरसिंह, विनयसिंह आणि रियाझ भाटी यांच्याविरोधात ठाणे न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट न्यायालयात सादर केले. ‘वॉरंटची अंमलबजावणी करण्याकरिता मुंबई पोलिसांनी एक पथक नियुक्त केले आहे. आरोपींच्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी चौकशी केली आहे.
Read Also :
- अनिल देशमुखांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग बंद? सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
- माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं; कर्मचाऱ्यानं खडेबोल सुनावलं
- विदर्भ दौऱ्या दरम्यान शरद पवारांना आली अनिल देशमुखांची आठवण; म्हणाले..
- गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, त्यांना विशेष सुरक्षा द्या; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र