मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूनं उभ राहिल्यानं यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? उद्या होणार फैसला..
एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू आहे आणि या संपकरी कर्मचाऱ्यांच्यासोबत गोपीचंद पडळकर हे सुद्धा मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहेत. तसेच यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर पडळकरांच्या गाडीवर सोलापूर येथे दगडफेक करण्यात आली होती.
काय आहे फडणवीसांच्या पात्रात?
विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असतात तसेच बहुजनांच्या हक्काचे लढे लढत असतात. यामुळे दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ले करताना दिसून येत आहेत. तथा सत्तापक्षाशी संबधीत लोक हे हल्ले करताना दिसत आहेत.
कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले
Read Also :
- खोट्या केसमध्ये वडिलांना तुरूंगात टाकलं, भाऊ बेपत्ता आहे, आम्हाला न्याय द्या; तरूणीने टाहो फोडला
- “अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”
- झूठ की सारी दिवारों को गिराते जायेंगे; नवाब मलिकांच्या ट्विट’ने पुन्हा संभ्रम
- शरद पवार यांचा यवतमाळ आणि वर्धा दौरा रद्द..!
- सातारा जिल्हा बँकेत पाटणकर विरुद्ध मंत्री देसाईत होणार हायहोल्टेज लढत; ५२ मतदारावर ठरणार राजकीय भवितव्य