मुंबई : आर्यन खान प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध एनसीबी, केंद्र सरकार असा संघर्ष जणू पाहायला मिळत आहे. आर्यन खान याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा पाय खोलात असल्याचे चित्र आता समोर आले आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरपासून? सरकारवर विरोधी पक्षांचा दबाव
आर्यन खानला जामीनही मंजूर झाला आहे आणि तरी देखील प्रकरण काही शांत झालेलं नाही. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्यात कमालीचा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. नवाब मलिक हे दिवसेंदिवस एका मागून एक माहिती समोर आणत आहेत आणि समीर वानखेडेंचे टेन्शन वाढवत आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकारणापलीकडची भेट?
आज वानखेडेंच्या जातीच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्याआधी नवाब मलिक यांनी सकाळी सकाळी ट्विट करत संभ्रम वाढवला आहे. “सच का आईना जमाने को दिखाते जायेंगे, झूठ की सारी दिवारों को गिराते जायेंगे ” असं सूचक ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. हा अप्रत्यक्षपणे वानखेडे यानांच इशारा आहे असं देखील बोललं जात आहे. काल समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडेकर यांनी देखील एक ट्विट केलं होत. यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांचा जन्माच्या दाखल्याचा फोटो ट्विट केला होता. यावर मालिकांनी केलेलं आजचं ट्विट बरच काही सांगून जात आहे असं म्हणायला हरकत नाही.
सच का आईना ज़माने को दिखाते जाएँगे,
झूठ की सारी दीवारों को गिराते जाएँगे।— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 18, 2021
दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना मलिक म्हणाले होते की, समीर वानखेडे विभागीय संचालक असताना गोवा राज्य देखील त्यांच्या अख्त्यारीत्या येतं होतं. सगळ्या जगाला ज्ञात आहे की गोव्यत ड्रग्जचा धंधा चालतो. मात्र तिकडं कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. कारण तिथं सगळं काशिफ खानच्या माध्यमातून रॅकेट चालत. काशिफ आणि समीर वानखेडे यांचे अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारतो की तुम्ही आतापर्यंत काशिफ खानला चौकशीसाठी का बोलवलं नाही ? असा सवाल देखील वानखेडेंनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- शरद पवार यांचा यवतमाळ आणि वर्धा दौरा रद्द..!
- सातारा जिल्हा बँकेत पाटणकर विरुद्ध मंत्री देसाईत होणार हायहोल्टेज लढत; ५२ मतदारावर ठरणार राजकीय भवितव्य
- कोल्हापूरात सतेज पाटील आज करणार शक्तिप्रदर्शन; दिग्ग्ज मंत्री, आमदार, खासदारांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज
- ‘एक पक्ष आणि एक गाव मात्र फडणवीसांना टोला आणि गडकरीचं कौतुक, काय म्हणाले पवार… पहा’
- मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार