मुंबई – मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांच्यात खडाजंगी सुरू झाली आहे. सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सिद्दीकी यांनी जगताप यांच्यावर अपमानास्पद वागणूक आणि अन्यायाचा आरोप केला असून कारवाईची मागणी केली आहे.
काँग्रेसला मोठा धक्का: माजी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या गळाला, पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत जगताप आणि सिद्दीकी यांच्यातील वाद सुरू झाला. राजगृह (बीआर आंबेडकरांचे निवासस्थान) येथे झालेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते आणि ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना आत जाऊ दिले नाही, असा दावा सिद्दीकी यांनी केला आहे.
दरम्यान, जगताप यांच्या निकटवर्तीयांनी सिद्दीकी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी निकटवर्तीयांनी म्हटलं की, वांद्रे (पूर्व) च्या आमदाराने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गैरवर्तन आणि अनुशासनहीन कृत्य केले ज्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.
विमानातील प्रवाशासाठी भागवत कराड ठरले देवदूत; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक
काय लिहिले आहे पत्रात?
भाई जगताप यांनी मला धक्काबुक्कीही केली आणि माझ्या समुदायाविरुद्ध “अपमानास्पद शब्द” वापरले. यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी झिशान यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. बैठकीतून बाहेर काढण्यावर नेत्यांनी म्हटलं की, जगताप यांनी मला सर्वांसमोर अशी वागणूक द्यायला नको होती…भाई जगताप यांनी मला धक्काबुक्की केली आणि माझ्याबद्दल आणि माझ्या समाजाबद्दल अत्यंत अपमानास्पद बोलले. सिद्दीकी यांनी दावा केला की, भाई जगताप यांनी माझ्यावर सातत्याने अन्याय केला आहे. मी जन्मापासूनच खरा काँग्रेसी आहे… माझा तुमच्यावर (सोनिया) विश्वास आहे की तुम्ही कठोर कारवाई कराल. जगताप यांच्या जवळच्या एका नेत्याने झिशान यांच्या दाव्याचं खंडन केलं आहे आणि सांगितले की, “भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मुंबईत पुन्हा काँग्रेसला नंबर वन पक्ष बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण काही लोक पैशाच्या अहंकारात काँग्रेसचे नुकसान करत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी.
Read Also :
- सत्तासंघर्ष भाग ४ : सतेज पाटलांचा अवघ्या २२ दिवसांत पराभव करणारे अमल महाडिक विधानपरिषदेचे उमेदवार
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचे टेन्शन वाढले; विरोधी उमेदवार रांजणे निर्णायक मते घेऊन नॉट रिचेबल
- “नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”
- मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले
- हिंसाचार प्रकरणी मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा; महत्वाचा दस्तावेज ताब्यात