नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते चार दिवसात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करतील. यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. आता त्याच गडात राष्ट्रवादी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.
विमानातील प्रवाशासाठी भागवत कराड ठरले देवदूत; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक
आज शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याना टोला लगावला. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केले. विदर्भातील मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या, असं पवार म्हणाले. तर गडकरी हे विकासकामं करताना पक्ष पाहत नाहीत, असं म्हणत पवारांनी गडकरींच्या कार्यशैलीचं कौतुक केलंय. पवार चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवारांकडून नवाब मलिकांची पाठराखण; म्हणाले, ‘अधिकारांचा गैरवापर करणाऱ्याला…
राज्य चालवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्यातील जनतेनं मला चार वेळा मुख्यमंत्री केलं. राज्य चालवण्याची संधी मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्याकडे पाहावं लागतं. पण मुख्यमंत्री ज्या भागातून आला त्या भागाकडे जास्त कल असतो. विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या, अशा शब्दात पवार यांनी नाव न घेता फडणवीसांवर टीका केलीय. समस्या काय आहे ती पाहून सोडवावी. ना की त्यांचा पक्ष पाहून. पण असे फार कमी नेते उरले आहेत. नितीन गडकरी यांनी विकासाची अनेक कामे केली. विकासकामं करताना गडकरी पक्ष पाहत नाहीत, अशा शब्दात पवारांनी गडकरींचं कौतुक केलं.
Read Also :
- मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
- सत्तासंघर्ष भाग ४ : सतेज पाटलांचा अवघ्या २२ दिवसांत पराभव करणारे अमल महाडिक विधानपरिषदेचे उमेदवार
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचे टेन्शन वाढले; विरोधी उमेदवार रांजणे निर्णायक मते घेऊन नॉट रिचेबल
- “नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”
- मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले