मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने महात्मा गांधी यांच्याबाबत विधान केलं आहे. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. असा दावा कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे. तर, कंगनाच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना, काँग्रेसने तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
“ महात्मा गांधींबद्दल कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अभिनेत्री कंगना रणौतवर कायदेशीर कारवाई करणार आहे. काँग्रेस तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवेल.”, असं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
“कोण होतास तू…काय झालास तू…असा कसा वाया गेलास तू”; फडणवीसांची राऊतांवर टीका
नाना पटोले म्हणाले, “हा राष्ट्रद्रोह आहे, काँग्रेसकडून याचा तीव्र निषेध केला जात आहे. त्यांना जो पद्मश्री देण्यात आला आहे, त्यामध्ये राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला पाहिजे व त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेतला पाहिजे. भाजपा वारंवार त्यांना पाठिंबा देत आहे, तर भाजपाने देखील याबाबत खुलासा केला पाहिजे, या अशा वक्तव्याचं ते समर्थन करतात की विरोध करतात? कारण या गोष्टी आता जास्त चालणार नाहीत. देशात लोकांचा उद्रेक व्हावा असं भाजपाला वाटतं का? हे प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेस त्या वक्तव्याचा निषेध करते. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांना कुणीही माफ करणार नाही. देशाची जनता देखील माफ करणार नाही आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना देखील कुणी माफ करणार नाही.”
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यातच घातला दगड
“या विरोधात कायदेशीर कारवाईबाबत आम्ही विचार करत आहोत, आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागार सेलशी देखील याबाबत चर्चा केली आहे. आम्ही पोलिसात देखील तक्रार दाखल करणार आहोत. आमच्या पक्षाच्या काही नेत्यांनी अनेक ठिकाणी एफआयआर देखील नोंदवले आहे आणि याबद्दल आता आम्ही संपूर्ण कायदेशीर कारवाई करू.” असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलून दाखवलं.
LIVE: पत्रकार परिषद
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 17, 2021
Read Also :
- “नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”
- मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले
- हिंसाचार प्रकरणी मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा; महत्वाचा दस्तावेज ताब्यात
- कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
- “विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”