मुंबई – अभिनेते विक्रम गोखले यांनी तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं होतं. तसेच शिवसेना आणि भाजप (BJP) युती तुटणं ही चूक असल्याचं म्हटलं होतं. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजित पवारांच्या वक्तव्याने विठ्ठल परिवारात मात्र मोठी खळबळ
शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं. हिंदुत्व आणि मराठी विचार रूजवला. संकट आले की बाळासाहेब हवे होते, याची आठवण येते. उद्धव ठाकरे सामान्य माणसांप्रमाणे जगतात. तोऱ्यात वागत नाहीत. हे मोठे यश आहे.
विक्रम गोखले कोण ? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. अशा व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही. अशी व्यक्ती सेनेच्या आसपास फिरकू नये. मुख्यमंत्र्यांनी नकली हिंदुत्वाचा धोका देशाला आहे असं म्हटल होते. तेच नकली हिंदुत्व सध्या पहायला मिळतंय असंही संजय राऊत म्हणाले.
नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल
काय म्हणाले होते विक्रम गोखले ?
राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे. आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं.
Read Also :
- कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले
- समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? उद्या होणार फैसला..
- शिवसेना नेते संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकारणापलीकडची भेट?
- ..तर पुण्यातील येरवडा इस्पितळात तुम्हाला दाखल करावं लागेल; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
- “वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”