श्रीवर्धन : २००९ पासून तुम्ही मला या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. श्रीवर्धन – म्हसळयाचा विकास हाच आमचा ध्यास. श्रीवर्धन – म्हसळयाचा विकास हाच आमचा श्वास. श्वास जिवंत तर आपण जिवंत. श्वास बंद तेव्हा जीवन बंद होते. गेल्या पंधरा वर्षांत या शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्यादृष्टीने पावले उचलली. हा ‘ट्रेलर आहे अजून पिक्चर अभी बाकी है’ हाताची बोटे सारखी नसतात. तरीसुद्धा दिर्घकाळ नेतृत्व करण्याची संधी मिळत असते तेव्हा त्या संधीचे सोने करण्याची इच्छाशक्ती लागते. जे – जे समाजाला अभिप्रेत आहे. उद्याचे २५ वर्षाचे भवितव्य डोळयासमोर ठेवत भारत सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या आणण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलेन असा विश्वास सुनील तटकरे यांनी नागरिकांना दिला. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ श्रीवर्धन शहरात शुक्रवारी तीन कॉर्नर सभा कसबा पेठ चौक, जीवना चौक, दांडा पाच रस्ता याठिकाणी सभा पार पडल्या. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…मोठी बातमी…! मतदानापुर्वीच अजित पवारांनी शरद पवाराचं मैदान मारलं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कामे संपत नसतात एक पूर्ण झाले की दुसरे सुरू होत असते पण एक काम संपल्यावर कुणाकडे मागितले जाते जो करेल त्याच्याकडे मागितले जाते. ज्याचा कामाशी सुतराम संबंध येत नाही… ज्याचा विचारांशी कधी संबंध येत नाही… त्या माणसाकडून अपेक्षा जनतेने करायच्या नसतात. काही वेळा काम केल्यानंतर अपेक्षा वाढतात याचा अर्थ माझ्या कार्यप्रणालीवर तुमचा विश्वास आहे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती असल्याचं सांगत तटकरेंनी श्रीवर्धनकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा…“पार्टटाईम राजकारण, केवळ काम करण्याचा अभिनय”,आढळराव पाटलांची कोल्हेंवर खोचक टिका
निसर्गाने या भूमीला वरदान दिले आहे. कौलारू घरे… नारळी सुपारीच्या, आंब्याच्या बागा… या गुणवैशिष्ट्यासह असलेल्या या भूमीमध्ये त्याचपध्दतीने विकासाची कामे करावीत… रोजगाराची साधने उभी करावीत हा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून करत आलो आहे.. टप्प्याटप्प्याने रुप बदलत गेले… शहर बदलत गेले… समुद्र किनार्याची नजाकत अधिक वाढत गेली… महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक यायला लागले.. अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या हेही सुनील तटकरे यांनी आवर्जून सांगितले.
कामे करायची तर मनापासून करायची.. कोण काय वागलं यापेक्षा… आज… आणि उद्याचा उष:काल… उद्याचे स्वप्न नेमके काय या गोष्टीकडे भर देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काम निर्माण करता येते.. ४० वर्षाची सेवा… सत्ता येत – जाईल निवडणूक येतील – जातील… जय – पराजय होत जातील. त्याहीपेक्षा समाजजीवनात ज्या कारणासाठी एकत्र आलो आहोत त्यावेळी लोकप्रतिनिधींकडून लोकांच्या तो उपलब्ध असला पाहिजे या अपेक्षा असतात . भविष्यात काय करणार याचा त्याच्याकडे रोडमॅप तयार असला पाहिजे असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..“थेट मुंबईहून आंतरवाली सराटी गाठत जय पवारांची जरांगे पाटलांशी भेट “राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…नितीन गडकरींनी सुनील तटकरेंना पाठवल्या खास शुभेच्छा, म्हणाले..
हेही वाचा..बारणेंसाठी पुत्र विश्वजीत बारणेंचा प्रचारात धडाका, तरूणांचाही मोठा प्रतिसाद
हेही वाचा..“मोदींच्या सभेमुळे धाराशिवचं राजकीय वातावरण बदललं”, धनंजय मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…“सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध,”, चंद्रकांत पाटील अन् मोहोळांचा सीएंशी संवाद