मुंबई : राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. यातच आता आणखी राज्य सरकारकडून आणखी एका निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.
झूठ की सारी दिवारों को गिराते जायेंगे; नवाब मलिकांच्या ट्विट’ने पुन्हा संभ्रम
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ४५५४ ग्रामंपचांतीमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतीच्या एकूण ७१३० रिक्त जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे. इच्छूकांना ३० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
“अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीमुळे आणि इतरही विविध कारणांमुळे राज्य सरकार निवडणूक घेण्याच्या बाबतीत संभ्रम अवस्थेत होतं. आता कोरोनाची लाट बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. लसीकरण देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘एक पक्ष आणि एक गाव मात्र फडणवीसांना टोला आणि गडकरीचं कौतुक, काय म्हणाले पवार… पहा’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना देखील करण्यात आलेल्या आहे. कोरोनाच्या संसर्गाची निवडणूक घेण्यात येणार आहे असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. राज्यातील ग्रामपंचायतीत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुका पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाव्यात आणि त्याची योग्य ती खबरदारी घ्या, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापुर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेतच ठेवा. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांपर्यंतच ठेवावे. आरक्षण मर्यादेची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येची गणणा विचारात घ्यावी, आदी सुचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार, नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेल्या रिक्त जागांचे सर्व साधारण जागत बदल करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेसाठी सुधारणा अधिसूचना २२ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
Read Also :
- खोट्या केसमध्ये वडिलांना तुरूंगात टाकलं, भाऊ बेपत्ता आहे, आम्हाला न्याय द्या; तरूणीने टाहो फोडला
- “अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”
- झूठ की सारी दिवारों को गिराते जायेंगे; नवाब मलिकांच्या ट्विट’ने पुन्हा संभ्रम
- शरद पवार यांचा यवतमाळ आणि वर्धा दौरा रद्द..!
- सातारा जिल्हा बँकेत पाटणकर विरुद्ध मंत्री देसाईत होणार हायहोल्टेज लढत; ५२ मतदारावर ठरणार राजकीय भवितव्य