नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागील वर्षी संसदेत आपल्या संख्याबळाचा वापर करत शेतकऱ्यांच्या संबंधीचे तीन कायदे संसदेत मंजूर करून घेतले होते. या कायद्यांची अंमलबजावणी होण्याआधीच हे कायदे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. संसदेत या कायद्यांवरून मोठा गदारोळ माजला होता. खुद्द भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनीही त्यावेळी राजीनामे दिले होते.
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; राज्यात ७१३० जागांसाठी निवडणूक होणार
त्यानंतर गेल्या वर्षभर केंद्र सरकारच्या या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन काही दिवसांपूर्वी हिंसक देखील झालेलं बघायला मिळालं होतं. केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कायदे मागे घेण्यासाठी तयार नव्हतं. वर्षभर न थांबता शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवलं आणि अखेर केंद्र सरकारलाही याबाबतीत नरमाई घ्यावी लागली.
“विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत असताना हे तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आता जावं, शेतात जाऊन काम सुरु करावं, नवी सुरुवात करावी असं आवाहन देखील मोदींनी केलं आहे. शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हे उद्दिष्ट त्यामागे होते. कित्येक वर्षांपासून ही काहींची मागणी होती. आधीच्या सरकारनं देखील यावर मंथन केलं होतं.
कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
यावेळीही चर्चा करुन हे कायदे संसदेत आणले आणि मंजूर केले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचेआभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले होते. दुर्दैवाने इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही कमतरता राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं. आज गुरुनानक जयंती आहे. आजचा दिवस पवित्र आहे. आम्ही कोणालाही दोष देणार नाही. कदाचित आमाच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांची समजूत घालण्यात कमी पडलो असं देखील मोदी म्हटले आहेत.
Read Also :
- योगेश बहल यांचे राजकारण : विरोधात गेल्या दोन बायका अन् फजिती ऐका !
- अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचे अडथळे; सीबीआयचा गंभीर आरोप
- देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात अजून का नाही? – देवेंद्र फडणवीस
- शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही – किरीट सोमय्या
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले..!