मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही कृषी कायदे मागे निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. या निर्णयानंतर शेतकरी, शेतकरी नेते, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आगामी निवडणुकीत पराभव होईल या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, आम्हीही आंदोलनात उतरलो होतो. आम्ही राष्ट्रपतींची सुद्धा भेट घेतली. आज अखेर तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. या निर्णयाचं मी स्वागत करतो. आगामी उत्तरप्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीत पराभव होईल या भीतीने हे कायदे मागे घेतले आहेत. शेतकऱ्यांची ताकद काय आहे हे सर्वांना माहिती आहे. संपूर्ण जगभरात या शेतकरी आंदोलनाची चर्चा होती. सरकारने एक वर्षाआधी हा निर्णय घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते.
शेतकरी या देशाचा अन्ननदाता आहे. शेतकऱ्यांच्यासोबत तुम्ही अशा प्राकरे वागू सकत नाहीत. संपूर्ण देश शेतकऱ्यांच्यासोबत आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचं मी स्वागत करतो, मी त्यांचं अभिनंदन करतो. शेतकरी संतप्त आहे आणि शेतकरी आपला पराभव करेल या भीतीने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले असंही संजय राऊत म्हणाले. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला. गाडी चालवण्यात आली. पण इतके होऊन सुद्धा शेतकरी आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि अखेर मोदी सरकारने तिन्ही काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला असंही संजय राऊत म्हणाले.
रामदास आठवलेंनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला; मोदी, शहा, नड्डांना भेटणार..!
संजय राऊत पुढे म्हणाले, सरकारची मनमानी आहे. ज्या पद्धतीने जनतेच्या रेट्यापुढे तीन कायदे मागे घ्यावे लागले. एकदिवस या केंद्र सरकारला ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सची मनमानी आहे त्याला सुद्धा चाप लावावा लागेल.
Read Also :
- एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार ही तर एक अफवा – माजी मंत्री सदाभाऊ खोत
- सात वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारनं पाय मागे घेतलाय; नवाब मलिकांची संतप्त प्रतिक्रिया
- मोदी सरकार देर आये, दुरुस्त आये; शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय – अमोल कोल्हे
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा; वादग्रस्त तीनही कृषी कायदे रद्द
- योगेश बहल यांचे राजकारण : विरोधात गेल्या दोन बायका अन् फजिती ऐका !