मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी नवा फॉर्म्युला दिला आहे. भाजपकडून शिवसेनाला सत्तेची साद घालण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेकडून भाजपला कोणताही प्रतिसाद देण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेने युती करावी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावं, असा फॉर्म्युला आठवले यांनी सूचवला आहे. त्यामुळे भाजप आठवलेंचा हा नवा फॉर्म्युला स्वीकारणार का? असा सवाल केला जात आहे.
कंगना रनावत ही एक राक्षसी वृत्तीची बाई; मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बरसल्या
शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला सत्तेतील 50 टक्के वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती-भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे, असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. महायुती व्हावी म्हणून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची आपण भेट घेणार आहोत. त्यांना आपला नवा फॉर्म्युला सांगणार असून त्यावर चर्चा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
“वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”
काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजप-शिवसेना-आरपीआय शिवशक्ती-भिमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे हे बाळासाहबांचे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी पुन्हा भाजप-शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला सत्तेतील 50 टक्के सहभाग द्यावा. या पर्यायावर भाजप आणि शिवसेनेने विचार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
Read Also :
- ‘एक पक्ष आणि एक गाव मात्र फडणवीसांना टोला आणि गडकरीचं कौतुक, काय म्हणाले पवार… पहा’
- मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
- सत्तासंघर्ष भाग ४ : सतेज पाटलांचा अवघ्या २२ दिवसांत पराभव करणारे अमल महाडिक विधानपरिषदेचे उमेदवार
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचे टेन्शन वाढले; विरोधी उमेदवार रांजणे निर्णायक मते घेऊन नॉट रिचेबल
- “नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”