नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. मला कुणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना आई-बहिणीवरून उत्तम शिव्या देता येत असतील, तर त्यांनी त्या महाराष्ट्र राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते आणि मंत्री यांना द्याव्यात, आम्ही शिव्या देणाऱ्यावर फुलं उधळू असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर आता बंडखोर आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊतांवर कडाडून टिका केली आहे.
“घरच्या कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते”; शिवेंद्रसिंह राजे
आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर आम्ही उठाव-क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना वाटणार आहे. त्यामुळे मादर***** संजय राऊत तु यापुढे अशी भाषा वापरू नको. राहिला प्रश्न आम्ही लढायचं की पडायचं? तर आमचा निर्णय जनतेला मान्य आहे. तुम्ही काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत केलेली हातमिळवणी जनतेला मान्य नाही. शिवसेना-भाजप म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. अमिताभ बच्चनचा डायलॉग चित्रपटासाठी ठिक आहे. पण महाराष्ट्रात आमच्या किती जागा निवडून येतात आणि तुमच्या किती जागा निवडून येतात ते आपण बघू असा इशारा बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणणारे कोण? ते स्वातंत्र्यलढ्यात तीन महिने आत जाऊन आले का ? कोणतं मोठं आंदोलन करून गेले होते.? त्यांच्यावर कसला शिक्का आहे मग? चौकशीतली जंत्री बाहेर आली तर त्यांना म्हणा आता शांत बसा. तीन साडेतीन महिने आराम केलाय. आता अजून आराम करायची सवय लागली आहे. बाहेर आल्यावर जास्त तणतण करू नका. सोसणार नाही तुम्हाला, प्रकृतीची काळजी घ्या. असा शाब्दिक टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लावला आहे.
“या बाईंमुळे, उद्धव ठाकरेंना आता महिलांच्या बंडालाही सामाेरं जावं लागणार”
दरम्यान, मागील काही दिवसापासून शिवसेनेतील नेत्यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करीत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्या महाप्रबोधन सभेतून बंडखोर आमदारांवर टिका करीत आहेत. तर संजय राऊत देखील सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.
“…..त्यामुळे ‘मादर****’ संजय राऊत तू यापुढे अशी भाषा वापरू नको.”
-आमदार संजय गायकवाड pic.twitter.com/N7L3o2o5fY
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) December 2, 2022
Read also
- “महाराष्ट्र द्वेषी शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्रातून लवकरच हद्दपार करा”
- “ठाकरेंनी संजय राऊत या पोपटाचे तोंड बंद केलं पाहिजे, नाहीतर उरलेली जनताही निघून जाईल”
- “कार्यकर्त्यांवर कारवाई होते मग कोश्यारींवर कारवाई का नाही”; संभाजी राजेंचा सवाल
- “आरोग्य मंत्र्यांना जिल्हा संभाळता येत नाही, राज्य कसे संभाळणार”?
- “मातोश्री 2 कशी झाली ? 126 कोटी बापाकडे अन् 11 कोटी पोरांकडे कसे आलेत ?” मनसेचा सेनेला सवाल