पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी कोकणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतिहासकार जयसिंगराव पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जयसिंगराव पवारांच्या भूमिकेवर समाज माध्यमांवरून अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. त्यावर आता स्व: जयसिंगराव पवार यांनीच कोल्हापुरातील राज ठाकरे यांच्या भेटीचा निवेदना द्वारे खुलासा केला आहे.
“जितका चिखल, तितकेच कमळ अधिक फुलणार”; नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसला प्रत्युत्तर
त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, राज ठाकरे याच्या कोल्हापुर दौऱ्यामध्ये माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली. मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्व विशद केले.
“उद्धव ठाकरे आणखी 2.5 वर्ष राहिले असते, तर त्यांचे केवळ 20 आमदारचं निवडून आले असते”
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रबोधकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल, त्याचे मी स्वागत करेन, असं म्हणालो, माध्यामांमध्ये त्याचे या विषयाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
“चंद्रकांत खैरे पिसाळलेले वक्तव्य करताहेत”; 5 कोटीच्या आरोपावर शिंदे गटाची प्रतिक्रिया
दरम्यान, राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरे बद्दल प्रश्न विचारल्यावर मी त्यांच्या इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केले नाही. कारण विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपुर्व टिका त्यांनी केली आहे. आणि त्यावर आजही मी ठाम आहे. यासंदर्भात वृत्तपत्रांत प्रसिद्ध बातम्यामुळे माझ्या वैचारीक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “या बाईंमुळे, उद्धव ठाकरेंना आता महिलांच्या बंडालाही सामाेरं जावं लागणार”
- “बोलायला ठेवलंय, भूंकायला नाही, राज ठाकरेंवर टिका करण्याअगोदर मालकाला विचारा”
- “शरद पवार साहेबांचे नाव घेतले की, ती बातमी होते”; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
- “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान नेमका कुणाला मिळणार”?
- “मी उद्धव ठाकरेंसोबत सातत्याने उभा आहे”; शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी