पुणे : आज कल कुणीही उठतं आणि राज ठाकरे साहेबांवर टिका करीत आहे. काल आमच्या पक्षात असलेली रूपाली पाटील देखील टिका करू लागली आहे. राज ठाकरे कधीही दुसऱ्यांच्या ओजळींने पाणी पीत नाहीत. तसेच काल देखील सुषमा अंधारे यांची बीडमधील सभा पाहिली. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला तिच्या नारू झाला का ? अशी टिका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी बीडमधील टिकेला त्यांनी पुण्यात उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
“चंद्रकांत खैरे पिसाळलेले वक्तव्य करताहेत”; 5 कोटीच्या आरोपावर शिंदे गटाची प्रतिक्रिया
ती म्हणाली होती, इतके वर्ष महापालिकेत सत्ता असूनही मातोश्रीवर मजला चढला नाही पण कृष्णकुंजच्या बाजूला अपार्टमेंट झालं. हे बोलण्याच्या अगोदर तीने आपल्या मालकाला विचारलं पाहिजे होतं. माझा नेता व्यवसाय करून अन् शासनाचे सर्व नियम पाळून इन्कम टॅक भरतात. ते टोपल्याच्या खाली झाकून त्यांनी बंगला बांधला नाही. मातोश्री 2 कशी झाली. 126 कोटी बापाचे, अन् 11 कोटी कसे झाले? हे धंदा करत होते, काय करत होते? कशाला बोलताय. स्त्री म्हणून गप्प आहे. नाही तर यापुढे राज ठाकरेंवर टीका कराल तर आम्हाला सगळेच माहिती आहे. असा इशाराही महाजनांनी सुषमा अंधारे यांना दिला आहे.
“तुम्ही वेगळी ओळख करायला जाता अन् घोटाळा होतो”; आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार
आमच्यासमोर कधीही अमित ठाकरे यांना वेगळी वागणुक नाही आहे. कळत नसताना सुद्धा पोराला कॅबिनेट मंत्री बनवलं. तो कुठेही बोलतो काहीही बोलतो. असं राज ठाकरे यांनी केले नाही.काही महिन्यापुर्वी शिवसेनेत पुरूषांचे बंड झाले आता राहिलेल्या सेनेत महिलांचे बंड होणार आहे. या बाईमुळे जितके दिवस उजेडात बायका होत्या. त्या अंधारात गेल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महिलांच्या बंडाला सामोरं जावं लागणार आहे. असंही ते म्हणाले.
“पैसे खर्च करून आदित्य ठाकरे माणसं आणतायेत”; संजय गायकवाडांची टिका
दरम्यान, सुषमा अंधारे यांची महाराष्ट्रभर प्रबोधन यात्रा सुरू आहे. सध्या त्या मराठवाडा, विदर्भात असून आपल्या जाहीर सभेत सुषमा अंधारे भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यातच त्यांनी बीड येथील सभेत राज ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्यावर आता मनसेकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
Read also
- “शरद पवार साहेबांचे नाव घेतले की, ती बातमी होते”; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
- “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान नेमका कुणाला मिळणार”?
- “मी उद्धव ठाकरेंसोबत सातत्याने उभा आहे”; शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी
- “जितका चिखल, तितकेच कमळ अधिक फुलणार”; नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसला प्रत्युत्तर
- “उद्धव ठाकरे आणखी 2.5 वर्ष राहिले असते, तर त्यांचे केवळ 20 आमदारचं निवडून आले असते”