मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जाती पातीचं राजकारण सुरू झाल्याची टिका राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. त्यावर राज ठाकरे यांनी इतकंही दुटप्पी सारखं वागू नये अशी टिका राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केली आहे.
“तुम्ही वेगळी ओळख करायला जाता अन् घोटाळा होतो”; आव्हाडांचा राज ठाकरेंवर पलटवार
राज ठाकरे यांनी केलेले आरोप धादांत बिनबुडाचे आहेत. त्याला काही अर्थ नाही. शरद पवार साहेबांचे नाव घेतले की ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य वाटत नाही. हेच राज ठाकरे जेव्हा पवार साहेबांची मुलाखत घेत होते तेव्हा काय बोलत होते? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. पवार साहेबांना उभा महाराष्ट्र 55 वर्षे ओळखतो आहे. 55 वर्षे ते राजकारण करत आहेत. पवार साहेबांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नेहमी डोळ्यासमोर ठेवले. तशाच पद्धतीने सर्व जाती- धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले. वास्तविक राज ठाकरे यांनी हा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद आहे. त्याच्या तसुभर देखील तथ्य नाही. नखभर देखील तथ्य नाही. असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले.
“पैसे खर्च करून आदित्य ठाकरे माणसं आणतायेत”; संजय गायकवाडांची टिका
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादावर अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री स्वत: कोर्टात गेले व त्यांनी कर्नाटक सरकारकडून प्रख्यात वकील रोहतगी यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र सरकारने वकील म्हणून हरीश साळवे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आम्ही करत असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.
Read also
- “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान नेमका कुणाला मिळणार”?
- “मी उद्धव ठाकरेंसोबत सातत्याने उभा आहे”; शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी
- “जितका चिखल, तितकेच कमळ अधिक फुलणार”; नरेंद्र मोदींचा काॅंग्रेसला प्रत्युत्तर
- “उद्धव ठाकरे आणखी 2.5 वर्ष राहिले असते, तर त्यांचे केवळ 20 आमदारचं निवडून आले असते”
- “चंद्रकांत खैरे पिसाळलेले वक्तव्य करताहेत”; 5 कोटीच्या आरोपावर शिंदे गटाची प्रतिक्रिया