मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं मंत्र्यांनी दौरे केले मदतीची घोषणाही केली गेली, अहो उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या मदतीच काय झालं? असा सवाल उपस्थित करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. जर शासनाने मदत जाहीर केली होती, ती मदत दिवाळीआधी मिळणार होती मग ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात का आले नाहीत? असा सवाल हि केला आहे.
आम्ही वारंवार प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी केली होती, पण याकडे सरकारने लक्ष दिले नाही, आता दिवाळी तोंडावर असताना मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? जर सरकारने ऐकलं नाही तर आम्ही मुख्यमंत्री यांना मातोश्रीवर भेटू नाही तर विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांना भेटू पण सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे असं हि खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
Read Also :
चित्रपटसृष्टी हादरली : सुशांतनंतर ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची आत्महत्या
आम्ही हरलेलो नाही, पुन्हा मतमोजणी करण्याची तेजस्वी यादव यांची मागणी
‘मंत्री जयंत पाटलांना जे फुकट मिळाल ते त्यांनी हजम कराव’, चंद्रकांत पाटलांची खोचक टीका
मंदिरं उघडण्यासाठी भावना भडकावून उद्रेक करण्याचा प्रयत्न चुकीचा, वारकरी साहित्य परिषदेची भूमिका