मुंबई : राज्यात मंदिरं सुरु व्हावीत अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण, मंदिरं उघडण्यावरुन राजकीय पक्षांनी वारकरी संप्रदायाच्या नावाने राजकारण करु नये.” असे विठ्ठल पाटील म्हणाले. तसेच, वारकरी सांप्रदायातील लोकांनीसुद्धा राजकीय लोकांसोबत जाऊन भडकाऊ वक्तव्य करणे टाळावे, असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी राज्यातील सर्व वारकऱ्यांना केले.
मंदिरं सुरु व्हावीत ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, त्यासाठी सर्वसामान्यांच्या भावना भडकावून उद्रेक करणे चुकीचे आहे, अशी भूमिका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मांडली आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ही भूमिका मांडली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
तसेच, राज्यात दारुची दुकानं आणि मंदिर यांची तुलना केली जात आहे. राज्यात दारुची दुकानं सुरु झाली; मग मंदिरं का सुरु केली जात नाहीत असा सवाल सरकारला विचारला जात आहे. त्यावरही बोलताना, मंदिरात लहान-थोर, महिला-पुरुष असे सगळेच आत्मशांतीसाठी येतात. पण दारु पिणारे मोजकेच आहेत. दारुचे दुकान आणि मंदिराची तुलना होऊ शकत नाही. असं ते म्हणाले.
Read Also :
नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची टीका
भाजपाविषयी मला अहंकार नाही तर प्रेम कारण भाजपा हा माझ्या बापाचा पक्ष: पंकजा मुंडे
…खरा खेळ तर आता सुरू झाला आहे, अर्नब गोस्वामीचे ठाकरेंना आव्हान
‘महाविकास आघाडीच्या आपसातील कुरबुरीच हे सरकार पडण्यास कारणीभूत ठरतील’
पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : राष्ट्रवादीला बसणार बंडखोरीचा फटका?
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार?