मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार जळजळीत टीका केली आहे. भाजप नेते नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची विक्रम-वेताळसारखी अवस्था झाली आहे. टीव्हीवर जसं एका जाहिरातीत ‘धुंडते रह जाओगे’ असं म्हटलंय तसेच पुरावे त्यांच्याजवळ आहेत”, असा घणाघात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला.
नारायण राणे यांनी दिवाळीनंतर भाजप सरकार पडणार, भाजप राज्यात दिवाळीनंतर ऑपरेशन लोटस राबविणार, असा दावा करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलं. नारायण राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे-वायकर कुटुंबीयांच्या नावावर 21 सातबारा उतारे आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली. “किरीट सोमय्या यांचं व्यक्तीमत्व पाहिलं तर त्यांचे विषय जेवनातल्या लोणच्याप्रमाणे आहेत. किरीट सोमय्या पांचट आहे हा वायकरांचा शब्दप्रयोग मला फार आवडला”, असा टोला गोऱ्हे यांनी लगावला.
Read Also :
…खरा खेळ तर आता सुरू झाला आहे, अर्नब गोस्वामीचे ठाकरेंना आव्हान
‘महाविकास आघाडीच्या आपसातील कुरबुरीच हे सरकार पडण्यास कारणीभूत ठरतील’
पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूक : राष्ट्रवादीला बसणार बंडखोरीचा फटका?
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक, कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार?
चित्रपटसृष्टी हादरली : सुशांतनंतर ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची आत्महत्या