मुंबई : मंगळवारी रात्रभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले. रेल्वे, बेस्ट सेवेवर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळाला. कोव्हिडच्या रुग्णांसाठी असलेल्या हॉस्पिटलमध्ये देखील पाणी साचले होते. यावरून भाजप नेते मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधत प्रश्नांचा पाऊसच पाडला आहे.
पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका?
नुसते फिरुन उपयोग काय?
ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा?
मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा?
पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 23, 2020
पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका. नुसते फिरुन उपयोग काय? ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा? मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?, असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला.
हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही?
116% नालेसफाईचे दावे कुठे गेले?
रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय?
कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?
(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 23, 2020
आशिष शेलारांनी आणखी एक ट्विट करत विचारले की, हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही? ११६ टक्के नालेसफाईचे दावे कुठे गेले? रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय? कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग, मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?
दरम्यान, मंगळवारपासून मुंबईत तब्बल 286.4 मिमि पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या पावसाने गेल्या अडीच दशकांमध्ये पहिल्यांदाच फक्त 24 तासांत मुंबईत सर्वाधिक पाऊस कोसळला आहे.