मुंबई – ठाकरे सरकारला आज वर्षपूर्ती झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकार आणि महाविकासाआघाडीवर जोरदार हाल करत चिरफाड केली. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चढवला होता.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील फडणवीसांचा समाचार घेतला. ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधानं केली आहेत. त्यात ‘सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही धमकी नव्हती काय?’ असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे. विरोधी पक्षानंही त्यांच्या पद्धतीनं वर्षपूर्ती साजरी केली. त्याचा मी आदर करतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.
“महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याबद्दलचं व्हिजन आवश्यक होतं, मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचं भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचं दिसून आलं”, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली. त्याला संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. आता यावर फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also –
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला ना राज्यपालांची उपस्थिती ना मुख्यमंत्र्यांची..!
“या सरकारला ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए”; फडणवीसांकडून ठाकरे सरकारची चिरफाड
“महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे?”