अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची हत्या झाल्याचं आरोप करतात तर पुरावेही देत नाही, हा काय प्रकार आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘ तुमचे पुरावे तुमच्याकडेच ठेवता. मग सुशांतसिंह प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का?; असं देखील ते म्हणाले आहेत.
आज सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तेच चालू आहे, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली. भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्ये करत असतील, तर ते राजकारण करीत आहेत. हे माझ्यासारख्याच काय तर सर्वसामान्य नागरिकांनाही कळतं, असा टोलाही त्यांनी लगावला. नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीच्या निमित्ताने रोहित पवार आले होते. यावेळी सुशांतसिंह प्रकरणावरून त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपचा सोशल मीडिया सक्षम आहे. या मीडियावर एखादा ट्रेंड चालवणे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमते. भाजपचे नेते शब्दात खूप चांगल्या पद्धतीने खेळतात.
दुसरीकडे, सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्येप्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरुन CBIने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकर CBIच्या मुंबई विभागाला हे प्रकरण वर्ग करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.