मावळ : श्रीरंग अप्पा बारणे यांनी या भागातील मतदारसंघातल्या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच या भागातील हा परिसर आता बदलला आहे. येथील गरिबी, भुकमारी, बेरोजगारी दुर होतांना आता दिसत आहे. तरूण मुलांच्या हाताला काम मिळत आहे. याचे श्रेय मला पण नाही, आणि नरेंद्र मोदी यांना देखील नाही. या सर्व कामाचं श्रेय तुम्हा लोकांचं आहे. पनवेलच्या जनतेने श्रीरंग बारणे यांना निवडून दिलं नसतं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते. मी केंद्रात मंत्री झालो नसतो. असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीरंग बारणे यांना पुन्हा केंद्रात निवडून द्या, असे आवाहन देखील गडकरी यांनी केलीय.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, प्रत्येकाला घर, गावागावात पाणी, शाळा, दवाखाना, रस्ता, वीज, शेतीमालाला भाव व रोजगार हे आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशाला भय, भूक, दहशतवाद व भ्रष्टाचार यापासून मुक्त करायचे आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची ‘शिवशाही’ आणि प्रभू रामचंद्रांचे ‘रामराज्य’ आणण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी मावळच्या मतदारांनी बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे.
हेही वाचा…आगामी काळात काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील ; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ
‘रस्ते विकासामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती’ मावळ विधानसभा मतदारसंघात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) विकसित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. पनवेल ते उरण हा आठ पदरी रस्ता पूर्ण झाला आहे. पागोटे ते चौक हा 4,500 कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निवडणुकीनंतर सुरू होईल व पुढील एक-दीड वर्षात पूर्ण होईल. या रस्ते विकासाबरोबरच रस्त्यांच्या कडेला लॉजिस्टिक पार्क व इंडस्ट्रियल हब होतील व त्यातून किमान दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल. या नोकऱ्यांमध्ये 80 टक्के जागा या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाव्यात, अशी शासनाची भूमिका राहणार आहे.
कळंबोली जंक्शन येथील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून बहुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार असून सुमारे 1600 कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प उभारण्यात येईल. हे कामही निवडणुकीनंतर सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. सागरमाला प्रकल्पांतर्गत या भागात तब्बल दोन लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत साडेचार लाख गावांना रस्त्याने जोडण्यात आले आहे. अजून दोन लाख गावांना रस्त्याने जोडण्याचे काम सुरू आहे किंवा व्हायचे आहे, या सरकारने आत्तापर्यंत 50 लाख कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…“देश का मूड मोदी के खिलाफ हो रहा है”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“राज्यात राजकीय वातावरण तापणार, खर्गे अन् प्रियांका गांधींच्या महाराष्ट्रात सभा”