मुंबई : कॉंग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही सुद्धा गांधी, नेहरू यांच्या विचाराचे आहोत. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात सध्या एकच खळबळ उडाली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच भाजपमध्ये एक गट मोदींच्या विरोधात असल्याचेही त्यांनी सांगितलंय.
राजकीय पक्षांच्या एका मोठ्या वर्गाला भाजप आणि मोदी आवडत नाहीत आणि हे विरोधक एकत्र येऊ लागले आहेत. देश का मूड मोदी के खिलाफ हो रहा है. आणि आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांना अनुसरून सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत. असेही ते म्हणाले. त्यावेळी उद्धव ठाकरे आपल्याच विचारधारेचे आहेत. ते समविचार आहे, असा दावाही शरद पवार यांनी केलाय.
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवून द्या,” कोल्हेंच्या विरोधात अजितदादांनी शड्डू ठोकला
दरम्यान, ‘द इंडियन एक्सप्रेस’या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले होते की ‘पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे त्यांनी पुढे म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात राजकीय वातावरण तापणार, खर्गे अन् प्रियांका गांधींच्या महाराष्ट्रात सभा”
हेही वाचा…आगामी काळात काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील ; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ