पुणे : शरद पवारांची विधानं ही कायमच काँग्रेसच्या विरोधात जाणारी असतात. ते काँग्रेसबाबतीत बोलतात एक आणि घडतं. काहीतरी भलतंच म्हणून आता खऱ्या अर्थाने काँग्रेसने सावध राहील पाहिजे, कारण शरद पवार हे उरली – सुरली काँग्रेस आपल्या ताब्यात घ्यायच्या मानसिकतेत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ‘पॉलिटिकल महाराष्ष्ट्र’ सोबत बोलताना दिली.
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवून द्या,” कोल्हेंच्या विरोधात अजितदादांनी शड्डू ठोकला
‘द इंडियन एक्सप्रेस’या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले होते की ‘पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे त्यांनी पुढे म्हटले.
हेही वाचा…बारामतीनंतर आता पुणे लोकसभा निवडणुकीकडे महायुतीचं लक्ष, पुण्यात महत्वाची बैठक
यावर राज्यभरातुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर बोलताना भाजपच्या राज्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. चव्हाण पुढे म्हणाले की, पवार हे अजगारासारखे आहेत ते याआधी भक्षाला ओंजरतात – गोंजारतात आणि मग अगदी टप्यात आलं कि भस्मसात करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने हि काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे.
दरम्यान ,अलीकडच भाजपवासी झालेले प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा पवारांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली की पवार साहेब हे विचारी नेते आहेत. त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असू शकतं.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात राजकीय वातावरण तापणार, खर्गे अन् प्रियांका गांधींच्या महाराष्ट्रात सभा”
हेही वाचा…आगामी काळात काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील ; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ