मुंबई : उद्धव ठाकरे आणि त्यांची उरलेली शिल्लक सेना सुद्धा लवकरच काँग्रेस मध्ये विलीन होईल,असा दावा शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी ‘पोलिटिकल महाराष्ट्र’ सोबत बोलताना केला.नुकतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं विधान केलं होत कि अनेक स्थानिक पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील. त्यावर बोलताना कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा…आगामी काळात काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील ; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ
कायंदे पुढे म्हणाल्या की ‘शरद पवार हे राजकीय दृष्ट्या प्रचंड जाणकार व्यक्तिमत्व आहेत. त्यांना अनेक बाबींचा लगेचच सुगावा हा लागत असतो. त्यांना सुप्रिया सुळे या पडतायेत असा अंदाज आला असावा. म्हणून त्यांनी आता असे राजकीय डाव खेळायला सुरवात केले असावेत.तसच पवारांच्या बोलण्यात प्रचंड तथ्य असल्याचं देखील कायंदे पुढे म्हणाल्या कारण पवारांना शिवसेनेच्या भविष्यकालीन बाबींचा अंदाज आला असावा. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला धरून देखील असे विधान केले असावे.कारण ठाकरे गटाची अवस्था खूप बिकट आहे.त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे.आता ते माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ,भगिणींनो आणि मातांनो देखील म्हणत नाहीत त्यांना मुस्लिम मतांच्या अनुनायासाठी काय – काय करावं लागतंय हे पवार साहेब बघत असावेत, त्यांनी त्याच बाबीला धरून हे विधान केले असावे.
दरम्यान,शरद पवार यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत असे भाष्य केले होते कि दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील.यावर राजकीय विश्वातून विविध उलट – सुलट प्रतिक्रिया आता उमटत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“देश का मूड मोदी के खिलाफ हो रहा है”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“राज्यात राजकीय वातावरण तापणार, खर्गे अन् प्रियांका गांधींच्या महाराष्ट्रात सभा”