देशासह राज्यभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा फटका शाळा-महाविद्यालयांना देखील बसला आहे. नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला असून, दहावीचा निकाल देखील या महिन्या अखेर जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली होती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
घरी रहा .. सुरक्षित रहा.. @CMOMaharashtra pic.twitter.com/M3IAy2kOwl
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 16, 2020
याच पार्श्वभूमीवर निकालानंतर आवश्यक असणारे गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली की, दहावी आणि बारावीच्या निकालानंतर लागणारे गुणपडताळणी, उत्तरपत्रिका छायांकित प्रत, पुनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज करून उपलब्ध होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.